@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*स्वादिष्ट प्रेते, संधीसाधू नेते*
*डॉ अनिल पावशेकर*
************************************
सध्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हे स्थळ प्रेत पर्यटकांनी गजबजून गेले आहे. झाडून पुसून अडगळीत गेलेले नेते आणि त्यांची पिलावळ लखीमपूर खीरीला प्रेताच्या खीरीसाठी जीवाचा आटापिटा करत आहेत. अर्थातच यात या संधीसाधूंना मृतांविषयी किती आत्मीयता आहे किंवा किती कळवळा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मात्र यानिमित्ताने का होईना उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा तसेच २०२४ च्या लोकसभा प्रेत मार्गाने सर करण्याचा विरोधकांनी चंग बांधला आहे.
झाले काय तर गेल्या रविवारी म्हणजेच चार ऑक्टोबरला शेतकरी आंदोलनादरम्यान भाजप नेत्याच्या कार ने चार शेतकऱ्यांना चिरडल्याचे दृश्य आहे. यातून उफाळलेल्या हिंसाचारात एका पत्रकारासह ड्रायव्हर आणि दोन भाजप कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. भाजप नेत्याच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना चिरडल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे तर आंदोलकांनी भाजप नेत्यांच्या कारवर हल्ला केल्याने परिस्थिती चिघळली असा दावा भाजप नेते करत आहे. अर्थातच पोलिस तपासात यात काय खरे काय खोटे याचा उलगडा नक्कीच होईल मात्र या दुर्घटनेत आठ बळी गेले हे विसरता येणार नाही.
या दुर्दैवी घटनेनंतर लगेचच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी उच्चस्तरीय चौकशी,कारवाईचे आदेश दिले. मात्र कित्येक दिवसांनी हातातोंडाशी आलेला हा मुद्दा विरोधक कसे काय सोडतील? मग लगेचच विरोधकांनी कंबर कसली आणि कबरीतील प्रेतांचे राजकारण सुरू केले. जगबुडी झाल्यासारखे संधीसाधू नेते लखीमपूरला धावू लागले. मग ते पंजाबचे, छत्तीसगड चे मुख्यमंत्री असो की नेहमीची प्रेतजीवी टोळी असो. तिकडे पंजाब छत्तीसगढचा तमाशा सोडून हे दोन्ही मुख्यमंत्री ज्याप्रकारे उत्तर प्रदेशात नाक खुपसून राहिले ते पाहता आपले ठेवावे झाकून दुसऱ्याचे पाहावे वाकून असे म्हणावेसे वाटते.
उत्तर प्रदेशातील वातावरण गरम होताच महाराष्ट्रातील कोमट सरकारला आश्चर्यकारक पणे अचानक उकळ्या फुटू लागल्या आहेत. ज्यांचे हात ११३ गोवारी हत्याकांडात गुंतलेले आहेत, मावळ गोळीबारात जे सामिल आहेत त्यांना चक्क जालीयनवाला बाग ची आठवण यावी यापेक्षा विनोद कोणता असणार. एवढेच कशाला महाराष्ट्रातील पालघरमध्ये साधुसंतांचा पोलिसांदेखत मुडदा पाडला गेला. मात्र तिथे हे प्रेतपर्यटक दिसले नाहीत. दुर्देवाने पालघर उत्तर प्रदेशात नाही अन्यथा त्या साधुसंतांना प्रेत पर्यटकांचा सहारा मिळाला असता. महाराष्ट्रात महिला अत्याचार असो अथवा नैसर्गिक आपत्तीचा ओला दुष्काळ असो, राज्यकर्त्यांना आपल्या राज्यातील समस्येपेक्षा उत्तर प्रदेशातील घटनेने स्वप्नदोष का होत आहे ही चिंतेची बाब आहे. सोबतच बंगालमधील सरकार प्रायोजित हिंसाचार निमुटपणे बघणारी उपरोक्त तिन्ही सरकारे लखीमपूर प्रसंगी एवढी उतावीळ का झाली आहे हे न कळण्याइतपत जनता दुधखुळी नक्कीच नाही आहे.
दुर्देवाने भाजप राज्यातील प्रेते मग ते कोरोना काळातील असो वा अन्य अप्रिय घटनांतील असो,, प्रेत पर्यटकांना ते इतके स्वादिष्ट का लागतात हा संशोधनाचा विषय आहे.निश्चितच अशा दुटप्पी वागण्याने या संधीसाधू नेत्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. या राजकीय पर्यटकांना दुर्घटनेतून सत्तेकडे जाण्याचा प्रेतमार्ग शोधायचा आहे. या दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींना सजा व्हायलाच हवी यात दुमत नाही. मात्र आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सध्या उत्तर प्रदेशात जी संधीसाधू नेत्यांची भाऊगर्दी झाली आहे ते योग्य नव्हे. बरे झाले योगींनी या टाईमपास नेत्यांच्या वेळीच मुसक्या आवळल्या अन्यथा यांनी आणखी पेटवापेटवी करत आपल्या राजकीय स्वार्थासाठी उत्तर प्रदेशात धुमाकूळ घातला असता.
************************************
दि. ०७ ऑक्टोबर २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment