Tuesday, February 11, 2025

टूटा है “आप” का घमण्ड!

   @#😈😈😈😈😈😈😈😈#@

          *टूटा है “आप” का घमण्ड*

              *डॅा अनिल पावशेकर*

++++++++++++++++++++++++

बहूप्रतिक्षित दिल्ली विधानसभेचे निकाल जाहीर झाले असून भाजप ला तब्बल २७ वर्षांनंतर राजधानीत सोनियाचे दिवस आलेले आहेत. एक दशकानंतर केजरीवालांचा बालेकिल्ला भेदून भाजपने हरयाणा, महाराष्ट्र पाठोपाठ दिल्ली काबीज करत विजयाची हॅट्रिक साधली आहे. पंतप्रधान मोदी मला पन्नास वर्षांत काय, या जन्मात दिल्लीत हरवू शकत नाही अशी दर्पोक्ती करणाऱ्या केजरीवालांची घमेंड जनतेने उतरवून लावली आहे. इंडी आघाडीचा बुडबुडा या निमित्ताने फुटला असून तिहेरी लढतीत भाजपने आम आदमी पक्षाला सत्तेतून बेदखल केले असून कॅांग्रेसची दुकानदारी बंद करून टाकली आहे.


असे म्हणतात की, अहंकार से तीन गये धन, वैभव, वंश, ना मानो तो फिर देखो रावण, कौरव, कंस. अगदी असेच काही अहंकाराने केजरीवाल यांचे झाले आहे. अन्ना आंदोलनात जन्मलेले हे रसायन शॅार्ट कट, रेडीमेड राजकारणाने दोन तीनदा सत्तेत आलेले होते. पण दिल्लीत कावळ्याच्या हाती मिळाला कारभार आणि त्याने हागून भरला दरबार असे झाले. मोफत वीज, मोफत पाणी, महिलांना मोफत प्रवास इ. स्वस्त लोकप्रिय करामतींनी देशात फुकटचंद राजकारणाची अनिष्ट परंपरा सुरू झाली. कोणताही राजकीय पक्ष फुकटची रेवडी वाटपा पासून स्वतःला दूर ठेवू शकला नाही. मतांसाठी प्रलोभनांची यादी दर निवडणुकीत वाढतच चालली आहे.


त्यातच मोहल्ला क्लिनिक असो की विश्वस्तरीय शाळांची कल्पना असो. यातील वास्तव आणि कल्पना यात जमीन अस्मानचा फरक असून केजरीवालांनी आपली प्रतिमा या ग्रहावरील एकमेव इमानदार राजकारणी अशी करून घेतली. राजनीती में नहीं आऊंगा जी, बंगला गाडी नहीं लुंगा, बच्चोंकी कसम खाता हूं असे शब्दांचे बुडबुडे उडवले. डबल एक्स एल ढगाळ शर्ट, ढिला फुलपॅंट, पायात स्लिपर आणि खिशाला पाच रुपयांचा पेन रोवून केजरीवालांनी आपण आम आदमी आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण कथनी आणि करणीतला फरक ओळखायला जनतेला दहा वर्षे लागली.


केजरीवालांचा सत्तेतील हनीमून संपताच जनता भानावर आली. दिल्लीकरांना वेठीस धरणारे शाहिनबाग आंदोलन असो की शेतकरी आंदोलन असो, पेयजल आपुर्ती, सांडपाणी व्यवस्था, कचरा नियोजन , वायु प्रदूषण, यमुना प्रदूषण, बोकाळलेला भ्रष्टाचार यांचा जनतेला उबग आला. या सर्वांवर मात केली ती मद्यघोटाळ्याने. सोबतच सरकारी अधिकाऱ्याला बंगल्यावर बडवणे असो की सहकारी स्वाती मालिवालला तुडवणे असो. केजरीवालांच्या पापाचा घडा भरला होता. त्यातच त्यांनी आप चे प्रमुख नेते, साथीदार यांना कट कारस्थाने करून हाकलून लावले होते आणि उरलेले तुरुंगाची हवा खात होते. पक्षात केजरीवालांचा वन मॅन शो सुरू होता. मात्र मद्य घोटाळा आप च्या शव पेटीवरील शेवटचा खिळा ठरला.


राहिली बाब मित्र पक्षांची तर  केजरीवालांनी दिल्लीत कॅांग्रेसला सिगरेटच्या थुटका एवढेही महत्व दिले नव्हते. नेहमीप्रमाणे कॅांग्रेस भाजपच्या पराभवासाठी आपल्याला वॅाक ओव्हर देईल या भ्रमात ते राहिले. तसेही आप ने गोवा हरयानात कॅांग्रेसच्या बुडाला आग लावली होती तर पंजाबात समूळ उच्चाटन केले होते. केजरीवालांच्या युज ॲण्ड थ्रो नितीने कॅांग्रेसही यावेळी हम भी डुबेंगे सनम तुमको भी ले डुबेंगे या मुड मध्ये होती. त्यातच आपले उपद्रवमुल्य जाणलेला ओवेसींचा पक्ष मैदानात उतरला होता. बटेंगे तो कटेंगे हे उमर अब्दुल्लांच्या लक्षात आले होते मात्र आप आणि कॅांग्रेस एकमेकांची कबर खोदण्यात व्यस्त होते. आधीच दुभंगलेली इंडी आघाडी यानिमित्ताने आणखी खिळखिळी झाली आणि याचा फायदा भाजपला झाला.


राहिली बाब भाजप ची तर लोकसभेला दाखवलेला अती आत्मविश्वास आणि फुशारकी, त्यातून घटलेले संख्याबळ त्यांना जमीनीवर आणण्यासाठी पुरेसा ठरले. उतू नका मातू नका करत भाजपने कंबर कसून हरयाणा पाठोपाठ महाराष्ट्रात बाजी मारली होती. केजरीवाल ॲण्ड कंपनीचा भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, अनागोंदी आदी मुद्द्यांवर त्यांनी रान पेटवले. सोबतीला शिशमहलचा मुद्दा जनमानसात केजरीवालांची पोल खोलण्यात महत्वपूर्ण ठरला. मोफत रेवडी सोबतच महिलांना २५०० रू. महिना महिला मतदारांना प्रभावित करून गेला. धर्मांधांचे तुष्टीकरण ऐवजी सर्वांचे संतुष्टीकरण सोबतच मोदी की गॅरंटी, विकासाची ग्वाही आणि भाजपची सांघिक कामगिरी भाजपला यश देणारी ठरली.


थोडक्यात काय तर दिल्लीत भाजप हा पक्ष इतर सर्व पक्षांचा बाप ठरला असून कॅांग्रेस पक्ष जवळपास समाप्त झाला आहे. सतत तीन विधानसभा निवडणुकीत शून्य जागा घेत कॅांग्रेसने अप्रिय हॅट्रिक साधली आहे. सोनियाजी, राहूल गांधीं, प्रियंका सारखे दिग्गज कॅांग्रेस नेते दिल्लीत असूनही पक्षाला दिल्लीत भोपळा फोडता आला नाही. तर आप पक्ष भलेही पराभूत झाला असेल तरीही त्यांना ४३.५७ टक्के मते मिळाली ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. एक मात्र खरे केजरीवालांनी पराभव मान्य करून उठसूठ ईव्हीएम च्या नावाने बोंबाबोंब करणाऱ्यांना उघडे पाडले आहे. तसेच मतांच्या टक्केवारीत एक दोन टक्के जरी फरक पडला तरी जागा वरखाली होऊ शकते हे महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा निवडणुकांवर शंका घेणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे. 


दिल्लीचा दिग्विजय भाजपाच्या पथ्यावर पडला असून इंडी आघाडीचे जहाज फुटण्याच्या मार्गांवर आहे. सोबतच आगामी बिहार आदी विधानसभा निवडणुकांत भाजप आणखी जोमाने उतरेल यात वाद नाही. तर कॅांग्रेसच्या सतत अपयशाने इंडी आघाडीत कॅांग्रेस पिछाडीवर आली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजप जवळपास संपूर्ण देश पादाक्रांत करत आहे. तर केजरीवालांच्या हातात केवळ पंजाब असून गमावलेले राज्य आणि विश्वासार्हता परत मिळवण्याचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. 

++++++++++++++++++++++++

दिनांक ११ फेब्रुवारी २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++


No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...